




Blog
Web Banner.jpg
Web Banner
Web Banner 2
Web Banner 4
महा आरोग्य ब्लॉग
मनोरुग्णालयातील माणुसकीच्या सेवेला सलाम…
“हरवलेला शिवम… आणि पुन्हा सापडलेलं ‘घर’!” दहा वर्षांपूर्वीचा तो दिवस… उत्तराखंडातील एका गावातून शिवम पुरात वाहून गेला , परिस्थितीशी झगडत महाराष्ट्रात आल्यावर शिवम, संभाजीनगर मधील…
No Comments
यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा प्रकल्पामुळे रुग्णालयीन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
राज्यातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ मुंबई – राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने…
No Comments
पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना
पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना मुंबई – राज्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती…
No Comments
Facebook Posts
8 hours ago
हत्तीरोग दुरीकरणासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ![]()
एकूण ३३ लाख १३ हजार ३९७ लाभार्थ्यांना हत्तीरोगविरोधी औषधे देण्याचे उद्दिष्ट![]()
#मुंबई – हत्तीरोग दुरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून त्याअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये दि. १० ते २३ फेब्रुवारी दरम्यान सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देऊन नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत एकूण ३३ लाख १३ हजार ३९७ पात्र लाभार्थ्यांना हत्तीरोगविरोधी औषधे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले आहे.![]()
ग्रामीण व शहरी भागातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत औषधे पोहोचतील, याची खात्री करावी, अशा सूचना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ![]()
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हत्तीरोग दूरीकरण २०२७ पर्यंत साध्य करावयाचे आहे. महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यांत हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार वर्ष २००४-०५ पासून हत्तीरोग दुरीकरणासाठी राज्यात हत्तीरोगासाठी संवेदनशील अशा लोकसंख्येच्या क्षेत्रात (२ वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रुग्ण वगळून) सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत (एम.डी.ए.) सर्व पात्र लाभार्थीना आयव्हरमेक्टिन, डीईसी, अल्बेंडाझोल गोळ्यांची वयोगटानुसारची एक मात्रा देण्यात येते. या १८ जिल्ह्यांमधील ११५ तालुक्यांपैकी ९९ तालुक्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरणाच्या विविध टप्प्यावर आहेत. ![]()
फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. यावर्षी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, पालघर, ठाणे व नंदुरबार या ६ जिल्ह्यांतील 16 तालुक्यांमध्ये हत्तीरोग जंतुसंसर्ग निर्देशांक १ % पेक्षा जास्त आढळल्यामुळे या तालुक्यांमध्ये सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये एमडीए आणि टास (ट्रान्समिशन असेसमेंट सर्व्हे) उपक्रम सुरू आहे.![]()
हत्तीरोग हा सार्वजनिक आरोग्यासमोरचा गंभीर प्रश्न असून संक्रमित डास चावल्यामुळे पसरणारा आणि दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणाऱ्या प्रमुख आजारांपैकी एक आहे. बहुतेकदा बालवयातच हा संसर्ग होतो. मात्र, त्याची लक्षणे प्रामुख्याने प्रौढावस्थेत दिसून येतात. या आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग असलेल्या लसिका संस्थेचे (लिम्फटीक सिस्टीम) नुकसान होते आणि याचा वेळीच प्रतिबंध न केल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये असामान्य अशी सूज येते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसून प्रतिबंध हाच उपाय आहे. हत्तीरोग प्रतिबंधासाठी दरवर्षी हत्तीरोगविरोधी औषधांचे सेवन करणे, हाच एकमेव प्रभावी उपाय असल्यामुळे दरवर्षी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रभावित क्षेत्रांमध्ये सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविली जाते. ![]()
या मोहिमेदरम्यान निवडलेल्या १६ तालुक्यांमध्ये डीईसी, अल्बेन्डाझोल आणि आयव्हरमेक्टिन अशी तीन औषधांची एकत्रित मात्रा दिली जाणार आहे. ही औषधे बूथवर तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन दिली जातील. दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना ही औषधे देण्यात येणार नाहीत. ही औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत तसेच, आशा कार्यकर्त्या किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत. ही औषधे आतड्यातील जंतुसंसर्ग तसेच, खरूजसारख्या त्वचारोगांवरही प्रभावी असून, मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास मदत करतात.![]()
#MassDrugAdministration #Albendazole #elephantasis #FilariasisAwareness #PublicHealth #healthcampaign
… See MoreSee Less

